मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर सत्ताधारी आण विरोधकांमध्ये जोरदार टिका टिप्पणी होतांना दिसत आहे. मेलला पोपट असून विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करून टाकावं. असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…भाजप नेत्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद रूचेना..? मुळीक म्हणाले “आजही आमच्या मनात सल…”
सर्वोच्च न्यायालयानं मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलंय. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचं. मला वाटलं होतं की या सरकारमध्येच एकच शहाणा माणूस आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी सगळे अतीशहाणे किंवा मूर्ख आहेत. देवेंद्र फडणवीस असं म्हणत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील असं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं समजलं आहे की, महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना पोपट जिवंत आहे हा संदेश देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना १६ आमदार निलंबीत होणार असं बोलावं लागतं असा टोला फडणवीसांनी लगावला.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलं उत्तर
दरम्यान, पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडमवीसांना वकिलीचं ज्ञान आहे, त्यांना कायदा कळतो. त्यांना प्रशासन कळतं. त्यांना राजकारण माहिती आहे. त्यांना पडद्यामागे काय चाललंय हे माहिती आहे. ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. तरी ते अशी वक्तव्य करतायत म्हणजे त्यांची काहीतरी मजबूरी दिसतेय. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार
हेही वाचा…जामखेड बाजार समितीचा सभापती कुणाचा ? रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
हेही वाचा…निवडणुकांचा बिगुल वाजला..! महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये, फडणवीसांचे संकेत
हेही वाचा…‘कर्नाटक पॅटर्न’ काॅंग्रेस महाराष्ट्रातही राबवणार ? निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरूवात