नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा एल्गार होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांसाठी देशभरातून शेतकरी रामलीला मैदानावर जमू लागले आहे. सोमवारी शेतकऱ्यांची महापंचायत संपली असली तर शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
हेही वाचा…संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू, शिंदे सभागृहात घोषणा करणार? उद्यापासून कर्मचारी कामावर हजर
30 एप्रिल रोजी यासदंर्भात शेतकरी नेत्यांची बैठक बोलवली आहे. यातच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोदी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास पुन्हा शेतकरी आंदोलन सुरू होईल आणि दीर्घकाळ चालेल असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या आश्नासनानंतर संपकरी कर्मचाऱ्यांची तलवार म्यान, ७ दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय
शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे न घेणे, कर्जमाफी, मोफत वीज आणि किसान आधारभूत किंमत न देण्याच्या निषेधार्थ ही महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी सायंकाळापासूनच रामलील मैदानावर शेतकरी जमू लागले आहे.
हेही वाचा…हक्कभंगाच्या नोटीशीला संजय राऊतांचं उत्तर, राऊतांनी डावच पलटवला, समितीचीच गोंधळात
दरम्यान, आगामी वर्षी लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधी संपुर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. यातच मागील काही वर्षी झालेल्या शेतकरी किसान आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. तीन मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. यातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Read also
- हेही वाचा…तयारीला लागा…! लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभेच्याही निवडणुकांचा धुराळा उडणार ?
- हेही वाचा…“सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, त्यासाठी मग अडाणी मेहुल चोक्सी, मोदी”, राऊतांची जहरी टिका
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा अटकेत”, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,,
- हेही वाचा…“आमची अवस्था दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी,” महापालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे काय बोलून गेले ?
- हेही वाचा…“सावरकर समझा क्या…”, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली, टिका टिप्पणीत ट्विटवार