मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडी आणि आयटी विभागाने छापेमारी सुरू केली आहे. सकाळी सकाळी इडी आणि आयटी विभागाचे 20 अधिकारी मुश्रीफांच्या घरी आल्याने कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी संपुर्ण कागल बंद ठेवण्याचं आव्हानही करण्यात आलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“बिचाऱ्या त्या ऊर्फी जावेदच्या खांद्यावर कशाला बंदूक ठेवायची”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना टोला
कार्यकर्त्यांना अडवले, पत्रकारांना रोखले, सर्वसामान्यांना थांबवले, पोलीस हतबल आहेत. यंत्रणा मुठीत आहे. सत्ताधारी उद्दाम आहेत. किती दिवस हा रडीचा डाव खेळणार? किती खोट्यानाट्या आरोपांत अडकवणार? असा सवाल करीत हा सत्याचा लढा सुरूच राहणार असा इशारा राष्ट्रवादीने राज्य सरकारला दिला आहे.
“विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातंय”, कारवाईनंतर मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया
भाजप नेते किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता इडी आणि आयटी विभागाने मुश्रीफांच्या कागल येथील घरावर छापेमारी केली. यातच पुण्यातील घरांवर तसेच नातेवाईंकाची चौकशी देखील केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता हसन मुश्रीफ केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
Read also
- “सत्तेसाठी भाजपसोबत केलेली हातमिळवणी शिंदे गटाला डोकेदुखी ठरतेय”
- “दाल मैं कुछ काला..!, योगेश कदमांच्या अपघातांवर रामदास कदमांचा संशय
- “सोमय्या एक वेळ इतरांसोबत पंगा चालला मात्र ही माती वेगळी”; राष्ट्रवादीचा किरीट सोमय्यांना इशारा
- “राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंच्या नावाची घोषणा”, राजेश टोपे, बनसोडे, चव्हाण यांना मोठी जबाबदारी
- धनंजय मुंडेंवर ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरू, जंयत पाटलांनी घेतली भेट