मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यात सुरूवात केली आहे. यातच काल शिवसेनेचा वर्धापन दिवस दोन्ही गटाने साजरा केला. तर आज मुंबई महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. यातच आता १ जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर काम करेन,” छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा
मुंबई महानगरपालिका अनेक घोटाळे मुख्यमंत्री कार्यालयातून कदाचित होत आहेत. गेले एक वर्षात हे आपल्याला समोर आलेले आहेत. असे खूप घोटाळे महाराष्ट्रभरातले असतील वेगवेगळे शहरांमध्ये असतील, पण प्रामुख्याने मुंबईतले जे घोटाळे आमच्या लोकांसमोर आलेल्या डोळ्यासमोर आलेले आहेत. त्याच्या विरुद्ध आम्ही एक मोर्चा जाहीर केलेल्या एक जुलैला हा मोर्चा आहे. त्याची आढावा बैठक आज आम्ही घेतली. मनात राग आहे की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय. कुठे जातोय हे कोणालाच माहिती नाहीये. किंवा सगळ्यांना पण माहिती असेल कोणाच्या खिशात जातोय हे देखील माहिती आहे. असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा…“राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा युवा कार्यकर्ता फोडला,” जंयत पाटलांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
सगळं करत असताना आज पदाधिकाऱ्यांची जरी बैठक झाली असेल. तरी संपूर्ण मुंबईला आम्ही आमंत्रित करतो. मुंबईकरांना आमंत्रित करतो की या मोर्चात सहभागी व्हा. कारण मुंबईत आपण बघितलं असेल, गेल्या एक वर्षात रस्त्याची काम, त्याचं आढावा आम्ही घेणारच आहोत. कारण रस्त्याची काम 50 रस्ते हे सगळ्यात कमी आकडे गेल्य़ा 100 वर्षाचे इतिहास असेल. तरी पण 50 रस्ते हे पूर्ण झालेले नाहीयेत. पण कमीत कमी 125 कोटीचा घोटाळा आहे. असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती”
हेही वाचा…“देशात स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात शक्तीशाली प्रधानमंत्री म्हणजे इंदिरा गांधी “, शरद पवार
हेही वाचा…“माझी श्रद्धा आता नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर”, आशिष देशमुखांचं विधान
हेही वाचा…“द गद्दार फाईल्स..!” काय म्हणावे, असुरांना…? तुम्हीच सांगा..! शिंदेंच्या बंडावरून दानवे संतापले
हेही वाचा…“अशोक चव्हाण यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बघायचंय”