पुणे : देशात स्वातंत्र्यानंतरच्या शक्तीशाली प्रधानमंत्री कोण हे विचारल्यावर इंदिरा गांधी यांचं उत्तर येतं. याचे महत्वाचे कारण म्हणजे इंदिरा गांधींनी देशात एक प्रतिष्ठा देण्याचे काम केले. रशियासारख्या बलाढ्य देशाने तेव्हा आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या जो सन्मान करायला हवा होता तो केला नाही म्हणून आपला स्वाभिमान गहाण टाकू शकत नाही, हे दाखवण्याची भूमिका तेव्हा इंदिरा गांधींनी घेतली. त्या एक शक्तीशाली प्रधानमंत्री होत्या म्हणून हे घडलं. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटोलें लाथा मारून हाकलतात,” आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
पुणे येथे यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव केला. यावेळी शरद पवार बोलत होते. नारी शक्तीच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा असा हा आजचा सोहळा आहे. गेल्या काही वर्षांपासून यशस्विनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपले सहकारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यामधून एक गोष्ट स्पष्ट होते की कर्तृत्वाचा वारसा हा केवळ पुरुषांकडे नाही. संधी मिळाली तर कर्तृत्व गाजवण्याबाबत मुली किंवा स्त्रिया कधीही कमी पडत नाहीत.
हेही वाचा…“वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा,” नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
पुढे बोलतांना ते म्हणाले की, याठिकाणी महिला धोरणाचा उल्लेख करण्यात आला. आम्ही महिला धोरण ठरवले आणि काही नवे कायदे केले. हे करताना त्याचे स्वागत झाले असे नाही. सुरुवातीच्या काळात याला छुपा विरोध झाला. मात्र मला आनंद आहे की हे महिला धोरण संपूर्ण देशाने स्वीकारले. त्यामुळे अनेक क्षेत्रात अतिशय उत्तम कर्तृत्व मुली दाखवत आहेत. ज्यातून देशाला पुढे नेण्यासाठी योगदान मिळत आहे.
हेही वाचा…“10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली”, ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा शिंदेंवर आरोप
एखादी भगिनी एक व्यक्तिमत्व कसे घडवते, एक कुटुंब कसे घडवते, याची शेकडो उदाहरणं आहेत. त्यामुळे अशी उदाहरणं देण्यासंबंधीची दृष्टी आणि कर्तृत्व ज्या व्यक्तींकडे आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना अधिकार दिला पाहिजे. हे जसे आपण करत राहू तसा हा देश आणि समाज बदलल्याशिवाय राहणार नाही. आज देशात जे बदल दिसत आहेत त्यात पुरूष आणि महिलांच्या अधिकारात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत काही अंतर नाही. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“माझी श्रद्धा आता नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर”, आशिष देशमुखांचं विधान
हेही वाचा…“द गद्दार फाईल्स..!” काय म्हणावे, असुरांना…? तुम्हीच सांगा..! शिंदेंच्या बंडावरून दानवे संतापले
हेही वाचा…“अशोक चव्हाण यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बघायचंय”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर काम करेन,” छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा
हेही वाचा…“राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा युवा कार्यकर्ता फोडला,” जंयत पाटलांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश