मुंबई : राज्यात राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर राज्यातील भाजपचं सरकार स्थापन होता होता राहिलं होतं. परंतु शिंदेच्या बंडामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत सहभागी झाला आहे. यावर आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला उपरोधिक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा युवा कार्यकर्ता फोडला,” जंयत पाटलांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड व सरड्याची अभद्र युती होय. घुबड दिवसा काम करू शकत नाही, ते केवळ रात्रीच बाहेर पडते, कावळा केवळ दिवसा दिसतो आणि सरडा वेळोवेळी रंग बदलतो. सरड्याने गरूडाची साथ सोडली आणि त्याचे दिवस फिरले. अशी ही महाविकास आघाडी टिकणारी नसून येत्या दिवसात काॅंग्रेससह अन्य विरोधकांचा पराभव निश्चित आहे. याउलट राज्यात भाजप नव्याने गरूडझेप घेऊन नवीन कीर्तीमान स्थापित करेल असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटोलें लाथा मारून हाकलतात,” आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
दरम्यान, राज्यात आगामी काही काळात विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देशात स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात शक्तीशाली प्रधानमंत्री म्हणजे इंदिरा गांधी “, शरद पवार
हेही वाचा…“माझी श्रद्धा आता नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर”, आशिष देशमुखांचं विधान
हेही वाचा…“द गद्दार फाईल्स..!” काय म्हणावे, असुरांना…? तुम्हीच सांगा..! शिंदेंच्या बंडावरून दानवे संतापले
हेही वाचा…“अशोक चव्हाण यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बघायचंय”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर काम करेन,” छगन भुजबळांनी व्यक्त केली इच्छा