मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या काही मस्तीखोर अधिकाऱ्यांनी आणि खोके सरकारच्या आणि अलीबाबाच्या परिवारातल्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीनी फोन करून एका शिवसेनेच्या शाखेवर हातोडा चालवला. त्यामुळे आता प्रत्येक सभा, प्रत्येक मोर्चा आणि प्रत्येक निवडणुकांमधून त्यांना उत्तर देण्यात येईल. तसेच आपले सरकार आल्यावर त्यांच्यावर बुलडोझर चालवल्या शिवाय राहणार नाही. असं युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे.
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी
माझ्याकडे मुंबईतील पन्नास रस्त्यांची यादी आहे. त्या मुंबईतील पन्नास रस्त्यांची काम करून दाखवा. गेल्या दहा वर्षापासून मुंबई शहारातील रस्त्यांची काम कशी होतात. ती पाहली आहेत. ५० रस्त्यांची यादी आली असून या रस्त्यांच्या कामं कमीत कमी दिवसात पुर्ण करू शकतील. परंतु या मिंधे सरकारने एकही रस्त्याचं काम केले नाही. १०० वर्षाच्या इतिहासात कमीत कमी रस्त्याचे टार्गेट घेणारी ही पहिला महानगरपालिका होती.परंतु त्यांनी हे देखील केले नाही. असं युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज तरूणांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान..! 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द
दरम्यान, राज्यात ज्यावेळी आमचं सरकार येईल. त्यावेळी या दलालांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या बंधूच्या वार्डात एकही रस्ता झालेला नाही. हे भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांना देखील मुंबई महानगरपालिकेत कुणी घोटाळा केला आहे. तसेच तुम्हाला देखील वाटतं असेल तर घटनाबाह्य सरकारला पाडून दाखवा. असं आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अपघातात एखादा व्यक्ती गेला की लोक बोलतात, तो ‘देवेंद्रवासी’ झाला”, शरद पवारांचा फडणवीसांना टोला
हेही वाचा…“मला पप्पू बोलतात ना…पप्पू चॅलेंज देतो..या माझ्या अंगावर…छातीवर वार करा”, आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेचा सातबारा फक्त शिवसेनेच्या बापाच्या नावावर”, धडक मोर्चातून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
हेही वाचा…भाजपच्या कॅनॉलमधून “राहुल कनाल” ला आता शुद्ध करणार का ? सुषमा अंधारेंचा भाजप अन् शिंदेंना सवाल
हेही वाचा…“बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं”