मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षामधील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाने केली आहे. यातच आता विधानसभा अध्यक्षांनी दिल्ली वारीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…नाशिकची मोठी फौज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
राहुल नार्वेकर यांनी अलिकडेच दिल्ली दौरा केला. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय घटनापीठाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपावल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सॉलिसीटर जनरल तुषार मेहता आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान या भेटी दरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची स्पष्टोवक्ती शुक्रवारी राहुल नार्वेकर यांनी दिली.
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे
दरम्यान, गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यातच आता अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर कर्नाटकात ‘RSS’ वर बंदी आणू, ” कर्नाटकात काॅंग्रेस मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
हेही वाचा…“ठाकरे, शरद पवारानंतर आता केजरीवाल राहुल गांधीच्या भेटीला जाणार”, मोदीविरोधात एकजूट बांधणार
हेही वाचा…“तु माझ्या मागे ईडी लावली, मी तुझ्या मागे मोक्का लावला,” खडसे अन् महाजन यांच्यात जंपुली
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी केली ४ कोटीची मागणी..! पक्षप्रवेशासाठी पैसे नसल्याने दिपाली सय्यदने दाऊदशी संपर्क केला, माजी पीएचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना लाखमोलाचा सल्ला