मुंबई : दिल्ली सरकार गेल्या आठ वर्षापासून आपल्या अधिकारांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात लढत आहे. या संघर्षामुळे प्रशासन आणि व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आठ वर्षाच्या संघर्षावर पाणी फेरले आहे. त्यसाठी केंद्र सरकारने खास संसदेत बिल आणले आहे. हे बिल राज्यसभेत मंजूर होऊ नये म्हणून विरोधकांची एकजूट बांधत असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत सांगितलं. आज केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात केजरीवाल यांनी शरद पवार यांच्याकडे मदत मागितली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“ठाकरे गटातील ‘ते’ खासदारही शिंदे गटात जाणार”,? शिवसेना खासदाराचा दावा
राष्ट्रवादीचा केजरीवाल यांना पुर्ण पाठिंबा असणार आहे. संसदीय लोकशाहीत काम करण्याचा सर्व अनुभव यासाठी पणाला लावणार. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप व्यतिरिक्त पक्षांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ठाकरेंचा ‘हिरा’ चमकला…! मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाची सत्ता ; दादा भुसेंना मोठा धक्का
तसेच देशात सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना भेटणार असून घटनात्मक व्यवस्थेवर, लोकशाही व्यवस्थेवर हे संकट असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. यातच आता उद्या काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. याआधी केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.
READ ALSO :
हेही वाचा…“तु माझ्या मागे ईडी लावली, मी तुझ्या मागे मोक्का लावला,” खडसे अन् महाजन यांच्यात जंपुली
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी केली ४ कोटीची मागणी..! पक्षप्रवेशासाठी पैसे नसल्याने दिपाली सय्यदने दाऊदशी संपर्क केला, माजी पीएचा खळबळजनक दावा
हेही वाचा…“महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना लाखमोलाचा सल्ला
हेही वाचा…नाशिकची मोठी फौज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे