नाशिक : राज्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत दहा जागा जिंकून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे यांच्यावर मात केली आहे. मालेगाव बाजार समितीच्या सभापती ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंचा हिरा चमकला अशी प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“मोदी सरकारमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या”, मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
नाशिक जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाने आपली सत्ता स्थापन केली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या बाजार समितीच्या सर्व पॅनलवर एकहाती निवडून आणण्यात अद्वय हिरे यांना यश मिळाले होते. आज दादा भुसे यांना आव्हान देत एकहाती सत्ता मिळवली आहे. मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी अद्वय हिरे यांची तर उपसभापती विनोद चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा…“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार
दरम्यान, अलिकडेच अद्वव हिरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर अद्वय हिरे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी लगेच उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली. तसेच त्यांची उपनेतेपदीही निवड करण्यात आली. यातच आता मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत हिरे यांना मोठा विजय मिळला आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजून जल्लोष साजरा केला.
READ ALSO :
हेही वाचा…“पटोले-पटेल मध्ये वैर, भाजपने साधला डाव, आमगाव गोंदिया बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’चा विजय”
हेही वाचा…“नागनाथ-सापनाथ एकत्र आले, पण आमच्याकडे ‘एकनाथ’आहे, आमचचं सरकार पुन्हा येणार”
हेही वाचा…“माझ्यामुळे इतरांचं काॅंग्रेसमध्ये वजन कमी होईल, अशी काही दुकानदार नेत्यांना भीती”, देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं