मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थितीत होते. देशात लोकशाही संपत चालली आहे. त्यामुळे देशातील सर्व विरोधकांनी एकत्रित येणं महत्वाच असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यावर आता शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी यावरून खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात युतीचं सरकार चांगलं काम करत आहे. आमचं सरकार चांगलं काम करतंय. राज्यात कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी राज्यात आमचंच सरकार येणार आहे. नागनाथ सापनाथ एकत्र आले आहेत. पण आमच्याकडे एकनाथ आहेत. त्यामुळे आमचंच सरकार येणार असा टोला हाणला.
हेही वाचा…२०१४ साली फडणवीसांना दिली होती टक्कर, काॅंग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर भाजपच्या वाटेवर ?
दरम्यान, काही लोकं फक्त राजकारण करतात, परंतु आम्ही राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं टिकवण्याचं काम करीत आहोत. आगामी वर्ष हा निवडणुकांचा आहे. यावेळी आपली ट्रेन हातातून सुटली तर देशात लोकशाही गायब होऊन जाईल. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष एकत्रित आलो आहोत. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि दिल्ली सरकारबाबत निर्णय दिला आहे. यातच केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विरोधात अध्यादेश काढला आहे. त्याच्याविरोधात आपल्याला लढावं लागेल. अस उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“माझ्यामुळे इतरांचं काॅंग्रेसमध्ये वजन कमी होईल, अशी काही दुकानदार नेत्यांना भीती”, देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं
हेही वाचा…“मोदी सरकारमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या”, मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
हेही वाचा…“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार