मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहेत. यातच आता राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यातच आता काॅंग्रेसमधून निलंबित झालेले काॅंग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी शिंदे आणि ठाकरे गटाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे राज्यात एकच चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा…मोदींना ‘२०२४’ ला मोठा झटका बसणार? कर्नाटक, महाराष्ट्र अन् बिहारचं राजकीय समीकरण काय सांगत ?
महाविकास आघाडीत जागावाटापाबाबत वाटाघाटी चालु असल्या तरी लवकरच महाविकास आघाडी तुटलेली दिसणार आहे. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या केसस सगळीकडे पाठिवल्या तर अन् दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर अपात्रतेच्या केसेस विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केल्या. या परिस्थितीत जर अपात्र आमदार झालेत. तर येणाऱ्या सहा वर्षात ते राजकारणातून बाद होतील. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळात ‘बच्चू कडूं’ना पहिली लॉटरी, शिंदेंच्या आदेशानुसार ‘बच्चू कडू’ झाले राज्यमंत्री
राजकारणातील व्यक्ती जर निवडणुकच लढविणार नसेल, तर अशी परिस्थिती त्यांना कधीही मान्य होणार नाही. त्यामुळे शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या हितासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांना एकत्रित यावं लागेल. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्रित येईल. अन् उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीत राहणार नाही. तसेच उद्धव ठाकरे अन् शिंदे एकत्रित आल्यानंतर पुन्हा ठाकरे भाजपसोबत जातील. असा दावाही असंही आशिष देशमुख यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस राहिल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…२०१४ साली फडणवीसांना दिली होती टक्कर, काॅंग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…२०२४ साली मोदींना ‘हा’ बडा नेता टक्कर देणार ? भाजपला धक्कातंत्र, सर्वेमधून आली महत्वाची माहिती
हेही वाचा…नेता असावा तर असा…! ‘मराठा प्रवीण पिसाळ’ कुटुंबियासाठी पाच लाखांची मदत, गरज पडल्यास ‘मुली’ला घेणार दत्तक
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?
हेही वाचा…“आपल्या हातून आता ट्रेन सुटली तर देशात लोकशाही गायब होईल,” केजरीवालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक