मुंबई : केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात दिल्ली सरकारने आता एकजूट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा…पुणे जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट अन् १ राज्यमंत्री…! २ मंत्रिपदासाठी ३ नावं चर्चेत
काही लोकं फक्त राजकारण करतात, परंतु आम्ही राजकारणाच्या पलिकडे जाऊन नातं टिकवण्याचं काम करीत आहोत. आगामी वर्ष हा निवडणुकांचा आहे. यावेळी आपली ट्रेन हातातून सुटली तर देशात लोकशाही गायब होऊन जाईल. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष एकत्रित आलो आहोत. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि दिल्ली सरकारबाबत निर्णय दिला आहे. यातच केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विरोधात अध्यादेश काढला आहे. त्याच्याविरोधात आपल्याला लढावं लागेल. अस उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट
भविष्यात असेही दिवस येतील की, फक्त केंद्रात निवडणुका होतील, राज्यात नाही. यातच फक्त 2024 पर्यंत निवडणुका होतील. त्यानंतर होणार नाहीत. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची आता गरज वाटू लागली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींना ‘२०२४’ ला मोठा झटका बसणार? कर्नाटक, महाराष्ट्र अन् बिहारचं राजकीय समीकरण काय सांगत ?
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळात ‘बच्चू कडूं’ना पहिली लॉटरी, शिंदेंच्या आदेशानुसार ‘बच्चू कडू’ झाले राज्यमंत्री
हेही वाचा…नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला ‘१९’ विरोधी पक्षांनी टाकला बहिष्कार, शरद पवार, ठाकरे, पटोलेंही..
हेही वाचा…भाजपची ऑफर नाकारल्याने जयंत पाटलांना इडीची नोटीस, भाजपात येण्याचा होता दबाव
हेही वाचा…धक्कादायक..! पुण्यात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं गुड कायम