मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या एका विधानामुळे संपुर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि त्यामुळे संपुर्ण ओबीसी समाज दुखावला गेला असेल तर काॅंग्रेसच्या हितासाठी राहुल गांधी भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाची माफी मागून हा विषय इथेच संपवायला पाहिजे. ओबीसी समजा दुखावल्यास त्याचा परिमाण काॅंग्रेसला मतदानाच्या स्वरूपात भोगाव लागेल अशी रास्त सुचना केल्यामुळे मला काॅंग्रेसमधून निलंबित केल्याची भावना माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केली. आशिष देशमुख यांना काॅंग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा…२०१४ साली फडणवीसांना दिली होती टक्कर, काॅंग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर भाजपच्या वाटेवर ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, काॅंग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या लोकशाहीसाठी, एकात्मतेसाठी, बलिदान दिले. महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे नेते मात्र, स्वांतत्र्य, लोकशाही असे काहीही मानत नाही. त्यांना जो आवडत नाही. त्याला ते दुर करतात. मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उचलत असल्यामुळे स्वत: ला ओबीसी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक काॅंग्रेस नेत्यांची अडचण होत होती. आशिष देशमुखांचे वजन वाढले तर आपले वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते. माझा गुन्हा कोणता, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. असंही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…२०२४ साली मोदींना ‘हा’ बडा नेता टक्कर देणार ? भाजपला धक्कातंत्र, सर्वेमधून आली महत्वाची माहिती
दरम्यान, राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी सुचना मी केली. काॅंग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असेल तर ही सुचना लोकतांत्रिक आहे. महाराष्ट्रातील काॅंग्रेसच्या नेत्यांना त्यांचा पक्ष लोकशाहीची नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते. असंही त्यांनी म्हटलं आहे. यातच आशिष देशमुख आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातही वाद झाले होते. त्यांनंतर ही हा प्रश्न ऐरणीवर आला होता.
ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल मला कॉंग्रेस नेत्यांनी पक्षातून काढले..#ओबीसी #obc #नागपूर #nagpur #Congress pic.twitter.com/IcOriJemkq
— Dr. Ashishrao R. Deshmukh (@AshishRDeshmukh) May 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं
हेही वाचा…“मोदी सरकारमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या”, मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
हेही वाचा…“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार
हेही वाचा…“शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा