नवी दिल्ली : मोदी सरकारमधील मंत्र्यांनी, नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या. हे लोक न्यायाधीस आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर मोहीत राबवतात. असा धक्कादायक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे. आज त्यांनी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?
भाजपचे लोक निवृत्त न्यायाधीशांना देशद्रोही म्हणतात. त्यांचा न्यायव्यवस्थेवरच विश्वास नाही. आता हे म्हणत आहेत की, सर्वोच्च न्यायालायने काहीही निर्णय दिला तरी आम्ही एकणार नाही. आम्ही अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उलथवून टाकू, अशी त्यांची भूमिका आहे. हे लोक जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडतात. आमदार खरेदी करतात, त्यांच्या मागे ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावतात. जर यांना इतकाच अंहकार असेल तर मग हे लोक निवडणुका घेतातच कशाला? असा सवालही केजरीवाल यांनी भाजपला केला आहे.
हेही वाचा…“आपल्या हातून आता ट्रेन सुटली तर देशात लोकशाही गायब होईल,” केजरीवालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक
आता असे दिवस येतील की, राज्यांमध्ये निवडणुका होणारच नाहीत. फक्त केंद्रात निवडणुका होतील. त्यातही २०२४ च्या निवडणुकांमध्ये जनता काय निर्णय देते, त्यावर बरेच काही अवलंबून असेल. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार
हेही वाचा…“शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…२०१४ साली फडणवीसांना दिली होती टक्कर, काॅंग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…२०२४ साली मोदींना ‘हा’ बडा नेता टक्कर देणार ? भाजपला धक्कातंत्र, सर्वेमधून आली महत्वाची माहिती
हेही वाचा…नेता असावा तर असा…! ‘मराठा प्रवीण पिसाळ’ कुटुंबियासाठी पाच लाखांची मदत, गरज पडल्यास ‘मुली’ला घेणार दत्तक