रत्नागिरी : आपल्या भारताचं नाव आज संपुर्ण जगात मोठं करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इतर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला जात असतांना आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या स्थानी आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. भारत हा महासत्तेकडे वाटचाल करत असल्याने विरोधकांची पोटदुखी चालली आहे. तसेच जितके विरोधी पक्ष मोदींच्या विरोधात एकत्रित येतील,जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर केला. आज शासन आपल्या दारी या योजने शुभारंभ रत्नागिरीत शिंदेंच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील जितके विरोधी पक्ष एकत्रित येतील. तितकाच त्यांचा पराभव होईल. आतापर्यंत जेवढे खासदार निवडून आले नव्हते. ते सर्व रेकार्ड ब्रेक खासदार येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून येतील. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं
दरम्यान, गेल्या अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार घरी झोपलं होतं. आज आम्ही लोकांच्या दारी योजना घेऊन जात आहे. त्यामुळे लोक आमच्याच बाजूने उभे राहतील. घरात बसून ऑनलाईन फेसबुकवर काम करणाऱ्या माणसांला मदत करणार नाहीत. असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरे गटातील ‘ते’ खासदारही शिंदे गटात जाणार”,? शिवसेना खासदाराचा दावा
हेही वाचा…ठाकरेंचा ‘हिरा’ चमकला…! मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाची सत्ता ; दादा भुसेंना मोठा धक्का
हेही वाचा…“पटोले-पटेल मध्ये वैर, भाजपने साधला डाव, आमगाव गोंदिया बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’चा विजय”
हेही वाचा…“नागनाथ-सापनाथ एकत्र आले, पण आमच्याकडे ‘एकनाथ’आहे, आमचचं सरकार पुन्हा येणार”
हेही वाचा…“माझ्यामुळे इतरांचं काॅंग्रेसमध्ये वजन कमी होईल, अशी काही दुकानदार नेत्यांना भीती”, देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल