मुंबई : राज्यात १५ जिल्ह्यांतील ४२ तालुक्यांतील दुष्काळी स्थितीचा अहवाल कृषी विभागाने मंत्रालयस्तरावर पाठविला आहे. त्यानुसार दुष्काळाची तीव्रता निश्चित केली जाणार असून, सुमारे ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून राज्य सरकारने घोषित केले आहेत. राज्यातील इतरही तालक्यात मोठा दुष्काळ निर्माण झाला असून शेतकरी राज्य सरकारकडून मदत मिळेल या आशावर बसला आहे. यातच आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारला शरीरातील अवयवांचे रेट कार्ड पाठवले असून त्याचा लिलाव करण्याची संतापजनक मागणी केली आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर मोठा रोष व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलंय”
राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यातच सरकारने फक्त ४२ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. परंतु इतरही तालुक्यात मोठा दुष्काळ पडल्याने शेतकरी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. याचाच रोष व्यक्त करत हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट शरीरातील अवयवांचे रेट कार्ड पाठवले आहेत. यानुसार किडनी – ७५,०००/ १० नग, लिव्हर – ९०,०००/ १० नग, डोळे – २५,०००/ १० नग यासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे ह्याचे भान महायुती सरकारला नाही. हेच शेतकरी जर आमदार खासदार असते तर त्यांच्याकरीता खोके देण्याची तयारी या सरकारने त्वरित दाखवली असती. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. अशी खरमरीत टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे त्याचं मला खूप दु:ख झालं,” ‘त्या’ फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. पण झोपेचं सोंग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सरकार करत आहे. शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे.
किडनी – ७५,०००/ १० नग
लिव्हर – ९०,०००/ १० नग
डोळे – २५,०००/ १० नगयासह शरीरातील इतर अवयवांचे रेट कार्ड काढून दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांनी ते सरकारकडे पाठवले आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे आणि त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, भुजबळांच्या बंगल्याची सुरक्षा टाईट
हेही वाचा…फडणवीसांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान नाशिकच्या ‘या’ दाम्पत्याला, फडणवीसांकडून विठ्ठलाच्या मंदिरासाठी निधीचा पाऊस
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांकडून पंढरीत विठूनामाचा गजर, टाळ मृदूंग वाजवत फुगडीही खेळली
हेही वाचा…“आधी गुन्हा अन् आता निमंत्रण,” लोअर परळ पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना निमंत्रण
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम