रत्नागिरी : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच राजकीय वातावरण तापलं असताना आता रत्नागिरीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खरंतर, निवडणुकांचे वारे फिरल्यापासून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू झालं आहे. अशात दापोलीत संदिप राजपुरे आणि नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. याचा भविष्यात शिवसेनेला नक्कीच फटका बसेल अशी चर्चा आहे.
समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो; NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र
गेले महिना, दोन महिने शिवसेनेत अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे ते आता पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच अलिकडेच रायगड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडी सत्तेत असताना अनंत गीते यांनी अशी टीका करणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून व्यक्त झाल्या होत्या.
बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना धमकी
अधिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेडमध्ये गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर हे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश निश्चित झाल्याचंही सांगण्यात येत आहे. राजपूरे – दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख, शंकर कांगणे – उपजिल्हा प्रमुख, विकास जाधव – युवासेना उपतालूका प्रमुख, दत्ताराम गोठल – तालूका प्रमुख, खेड या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
Read Also :
- जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय – चित्रा वाघ
- समीर वानखेडे यांच्या कुटूंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या; जीवाला धोका असल्याचा पत्नीचा दावा
- अखेर समीर वानखेडे यांचा करेक्ट कार्यक्रम; लवकरच बदली होणार?
- समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, माझी मुलगी गुन्हेगार आहे काय? – नवाब मलिक
- पुणे महापालिकेत लोकसंख्येनिहाय नगरसेवकांची संख्या ठरणार? 166 ऐवजी 183 उमेदवार असणार!