सिंधुदुर्ग : जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कणकवली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार अज्ञानी आहेत, त्यांनी स्वत:च्या खात्याचं पाहावं असा प्रहार केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली येथे प्रश्न विचारला असता अजित पवार अज्ञानी आहेत, असा पलटवार त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केला.
उन्होंने हवा कर दी सर! नारायण राणेंना केंद्रातील बड्या नेत्याचा फोन, संवाद झाला व्हायरल
“अद्याप राष्ट्रवादीकडे वळलो नाही. तुमच्या तिजोरीत खडकडाट असल्याने केंद्राकडे हात पसरले, राज्यातील शेतकऱ्यांना, पुरग्रस्तांना , एसटीचे पगार देण्यासाठी पैसा नाही. ही राज्याची अवस्था आहे. एका रात्रीत आपल्यावरी गुन्हे काढून टाकण्यासाठी पदाची शपत घेणाऱ्या अजित पवारांनी मला तोंड उघडायला लावू नये,” असा इशाराही राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला नारायण राणे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.
“…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
राणे यांच्या खात्याकडून राज्याला निधी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, सुक्ष्म आणि लहान खात्यातून आम्हाला काय निधी मिळणार?, केंद्रातून निधी द्यायचाच म्हटलं तर नितीन गडकरी यांचं खातं निधी देऊ शकतं. गडकरींनी याआधी बराच निधी दिला आहे. राज्यात अनेक कामेही प्रगतीपथावर आहेत, असे अजित पवार म्हणाले होते.
नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांची सणसणीत चपराक
यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाले. आता अग्रलेख वैगेरे येत आहेत. आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा. संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करत आहेत हे पहावं. संजय राऊत आम्हाला बोलण्यासाठी, माहिती काढण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, असे राणे म्हणाले.
ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी केंद्रीय मंत्री म्हणून निवड केली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. सरकारने केलेल्या कामाची माहिती या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. जनआशीर्वाद यात्रेला दहा दिवस झालेत. लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. लोकांनी खूप गर्दी केली, रिकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. पत्रकारांनी मला खूप प्रसिद्धी दिली. पैसे देऊनही इतकी प्रसिद्धी मिळत नाही. यासाठी पत्रकारांचे मी आभार मानतो, अशी उपहासात्मक टिप्पणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.
Read Also :
- १०० कोटी वसुलीत अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचा सीबीआयचा अहवाल, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर?
- संजय राऊतांनी शिवसेना पुर्णपणे खड्यात घातली; नारायण राणेंचा प्रहार
- राज्यात कायद्याचं राज्य आहे, मग अनिल परब यांना स्वत:हून अटक करा – चंद्रकांत पाटील
- महामारी नियमांचं पालन करुन राष्टवादी अध्यक्ष शरद पवार करणार राज्याचा दौरा
- मी न घाबरणारा मराठा! छोटेखानी भाषणात ऍड. उज्ज्वल निकम यांचे उद्गार