गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गेल्या ९ वर्षापासून विकासाकडे कुच करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचं असले की राज्य सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या योजना संपुर्ण जनतेला पोहचवल्या जातात. नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अनेक विकासात्मक योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ जनतेला होत आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार एकाच मंचावर आले. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“ज्या दिवशी मंत्रिपद मिळालं, तेव्हा आई शेतात काम करीत होती,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
याठिकाणी येत असतांना आम्ही गडचिरोली येथे मोठं विमानतळ झालं पाहिजे. यावर विचार करीत होतो. या जिल्ह्यात अनेक उद्योगपती, व्यवसाय जिल्ह्यात आलं पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही करण्याचा विचार करत आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून अनेक कामे करण्यात आली आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक कामे झालीत. असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा…” राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात विधानसभेच्या ४०० तर लोकसभेच्या १०० जागा करून टाका”
दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. तसेच या कार्यक्रमात पहिल्यांदाच अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी शासनामार्फत, तसेच केंद्र सरकार माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा देखील उल्लेख केला.
READ ALSO :
हेही वाचा…““हवं तर राजकारण सोडून देतो, पण तुम्ही राष्ट्रवादीत परत या,” आव्हाडांची अजित पवारांना भावनिक साद”
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोयता कुऱ्हाडीने खून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ
हेही वाचा…शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली त्यांच्या कर्माने, पण आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचा टाहो भाजपच्या नावाने का?
हेही वाचा…शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया वेग, नार्वेकरांची सेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर दोन खासदारांमध्ये जुंपली, कोल्हे-आढळराव पाटील एकमेकांत भिडले..!