मुंबई : राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या बंडानंतर दोन गट पडल्याने आमदार, खासदारांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यातच अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत यावं. असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहेत. तर याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना राष्ट्रवादीत पुन्हा यावं अशी भावनिक साद घातली आहे.
हेही वाचा…” राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात विधानसभेच्या ४०० तर लोकसभेच्या १०० जागा करून टाका”
आम्ही त्या दोन- चार जणांमुळे बाहेर पडलो असं अजित पवार गट सांगत आहे. मला सत्तेत राजकारण करायचे नाही. पैशाच राजकारण करायचे नाही, जर तुम्हाला वाटत असेल माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर गेल्याने पक्ष खुप वाढणार आहे. तर मी शपथ घेतो की मी तर बाहेर जाईनच जयंत पाटील यांनाही घेऊन जाईन. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काॅंग्रेस अलर्ट मोडवर, सगळ्या काॅंग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं
अजित पवार गट हा जयंत पाटील आणि आमच्यावर टिका करत आहे की बडव्यांनी शरद पवार साहेबांना घेरले आहे. या बडव्यांना नाही राहायचं. आम्हाला काहीही नको. आम्ही सगलं सोडून जातो. तुम्ही फक्त परत या, पण साहेबांना त्रास देऊ नका. असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोयता कुऱ्हाडीने खून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ
हेही वाचा…शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली त्यांच्या कर्माने, पण आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचा टाहो भाजपच्या नावाने का?
हेही वाचा…शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया वेग, नार्वेकरांची सेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर दोन खासदारांमध्ये जुंपली, कोल्हे-आढळराव पाटील एकमेकांत भिडले..!
हेही वाचा…“ज्या दिवशी मंत्रिपद मिळालं, तेव्हा आई शेतात काम करीत होती,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना