मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यातील समीकरणाचा पूर्णपणे बदलली आहेत. यातच आता ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचीकेवर विधानसभा अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील आणि ठाकरे गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या निर्णयावर आता वेगाने राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.
हेही वाचा…२१ वर्ष, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही..! शिंदे गटात गेल्याने निलम गोऱ्हेंना आदित्य ठाकरेंचा टोला
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस पाठवली आहे. सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष नंतर शिवसेनेच्या सोहळा 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला. यानंतर या बाबत निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटातील आमदारांनी केली होती. यातच आता शिवसेना आणि ठाकरे गटातील आमदारांना विधानसभेमध्ये आपलं आपली बाजू मांडण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सात दिवसांचा सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. यातच शिवसेनेच्या संविधानाची प्रत विधिमंडळाला प्राप्त झाले. त्यानंतर या सगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.
हेही वाचा…हिंदुत्व, लव्ह जिहादवरून भाजपच्या नेत्यांना रडवलं, अजित पवार गटाकडून ‘या’ आमदाराची प्रतोद म्हणून निवड
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार हल्ला चढावला जात आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे शिंदे गटाचा फक्त पोपट मेला आहे. याची नार्वेकरांकडून फक्त घोषणा बाकी अशी प्रखर टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. तर शिंदे गट अपात्र ठरणार आहे, याची फक्त औपचारिकता बाकी असल्याची बाकी असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलं आहे, तर विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेली नोटीस ही कायदेशीर आहे. आम्ही अपात्र होऊ की नाही हे विरोधकांचं काम आहे. त्यामुळे आता याबाबत सर्व अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर दोन खासदारांमध्ये जुंपली, कोल्हे-आढळराव पाटील एकमेकांत भिडले..!
हेही वाचा…“ज्या दिवशी मंत्रिपद मिळालं, तेव्हा आई शेतात काम करीत होती,” राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
हेही वाचा…” राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात विधानसभेच्या ४०० तर लोकसभेच्या १०० जागा करून टाका”
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काॅंग्रेस अलर्ट मोडवर, सगळ्या काॅंग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं
हेही वाचा…“जयंत पाटलांवर अपात्रतेची कारवाई करणार नाही,” अजित पवार गटाचा मोठा निर्णय