मुंबई : ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यादिवशी सांगण्यात आलं की तुम्हाला कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घ्यायची आहे. तेव्हा मलाही शॉक बसला. पहिल्यांदा आमदार झालो, त्यानंतर मला आज कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड पुकारून शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मंत्रिमंडळात अनिल पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी ते खूप भावुक झाले आहे.
हेही वाचा…अत्यंत जवळचा विश्वासू, माजी मंत्री आमदार शरद पवारांची साथ सोडणार
ते पुढे म्हणाले की, “ ज्या दिवशी मला मंत्रिपद मिळालं त्या दिवशी माझी आई शेतात निंदणी करायला गेलेली होती. मंत्रिपद मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अजित दादांमुळे जीवदान मिळालं. त्यामुळे त्याची परतफेड करणे एवढेच मनात होतं. मला अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मंत्रिपदाची संधी मिळाली. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी मंत्री होईल.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, महायुतीत आणखी एक भिडू सहभागी होणार का?
दरम्यान, मोठ्या कालावधीनंतर अमळनेरला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासह जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा कसा पुढे जाईल?, याचा प्रयत्न मी करणार आहे. आतापर्यंत ज्या समस्यांसाठी आवाज उठवला आहे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष कसा होईल, याचाही प्रयत्न असेल. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…” राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात विधानसभेच्या ४०० तर लोकसभेच्या १०० जागा करून टाका”
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काॅंग्रेस अलर्ट मोडवर, सगळ्या काॅंग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं
हेही वाचा…“जयंत पाटलांवर अपात्रतेची कारवाई करणार नाही,” अजित पवार गटाचा मोठा निर्णय
हेही वाचा…२१ वर्ष, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही..! शिंदे गटात गेल्याने निलम गोऱ्हेंना आदित्य ठाकरेंचा टोला
हेही वाचा…हिंदुत्व, लव्ह जिहादवरून भाजपच्या नेत्यांना रडवलं, अजित पवार गटाकडून ‘या’ आमदाराची प्रतोद म्हणून निवड