मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक राजकीय गणितं बदलली आहेत. यातच एक दिवसापुर्वी मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा…निलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदे गटात केला पक्ष प्रवेश
राज्यात अजित पवार यांनी सरकारमध्ये सत्तेत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रखर शब्दात प्रतिक्रिया दिली होती. राज्यात सध्या राजकीय चिखल झाला आहे. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे वर्षावर दाखल झाले आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सहा आमदारांनी शरद पवारांना संपर्क साधला ? शरद पवार गटाचं संख्याबळ वाढलं
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून सत्तेत येण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं. असे बॅनर लागले होते. तसेच मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंच्याच समोर याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेले आहे. त्यामुळे आता यानंतर काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच राज ठाकरे महायुतीत येणार का ? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नीलम गोऱ्हेंचं शिंदे गटात प्रवेश, ‘भावी आरोग्यमंत्री’ म्हणून सुषमा अंधारेंनी दिल्या शुभेच्छा
हेही वाचा…“..त्या दिवशी त्या गायब होत्या, संधीसाधू लोकं,” ठाकरे गटाने निलम गोऱ्हेंवर केली परखड टिका
हेही वाचा…राजकारणातून ब्रेक घेणार..! पंकजा मुंडेंच्या विधानावर फडणवीसांचं सुचक विधान, म्हणाले, “राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्याने..”, *
हेही वाचा…सुषमा अंधारेंमुळे ठाकरे गट सोडताहेत का? निलम गोऱ्हेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या, “अजून काही वेटींग लिस्टवर..”,
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिपुत्रांच्या सत्ता संघर्षात प्रशासकीय ‘वाघाची शिकार’? राहुल कलाटे यांना शह देत जितेंद्र वाघ यांची मुदतपूर्व बदली