मुंबई : शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कांयदे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याच वेळी निलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांच्या प्रश्नावर सुचक वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा…83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात, उद्या शरद पवारांची पहिली सभा, अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष
सुषमा अंधारे यांना अधिक संधी मिळत असल्याने शिउबाठा नेत्या आणि विधानपरिषद सदस्य असलेल्या निलम गोऱ्हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर निलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भाजपसोबतची युती फार वर्षापुर्वीची आहे. शिवसेना पक्षात असं कोणावरही नाराज होऊन पक्ष बदलत नसतात. यासंदर्भात माझी स्पष्ट भूमिका घेतली आहे. परंतु बऱ्याच प्रमाणात महिला आघाडीत काम केलं आहे. त्यामुळे असं नाराज होऊन काहीही होणार नाही. अनेक जण खऱ्या शिवसेनेत येणार असून अजून वेटिंग लिस्टवर आहेत. नाराजी वगैरे काही नाही. असंही निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या महिला आमदार शिंदेंच्या वाटेवर
शिवसेना योग्य मार्गावर महिला विकास व महाराष्ट्र आणि देश विकासाच्या प्रश्नावर नामदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. भारतातील विचारसरणी पैकी 1992 नंतर अद्विद्रोही करण्यात एनडीए आणि युपीए अशा राजकीय आघाड्या झाल्या. 1998 मध्ये आता मला पक्ष आणि महिला धोरण आणि सामाजिक न्याय शिवसेनेत मला खूप चांगलं काम करता आलं. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे. की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच अधिकृत आहे, केंद्रीय स्तरावर आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोग्य श्रीराम प्रभूंचे मंदिर आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे. राज्यघटने तुलनेत केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहे. पंतप्रधान माननीय नामदार नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…अजित पवारांच्या मदतीनं शिरूरमध्ये कमळ फुलणार का?
दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, विशेषता 1985 ला शहाबानो बेदम खटल्यात न्यायालयाने शहाबानांना पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. तथापि विरोधाला दबावला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला घटस्फोट अधिकाऱ्याचे संरक्षण कायदा 1986 संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव मान्य सहन करावा लागला. विषयातून स्पष्ट होते की सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात सामान्य मिळावा अशी आवश्यकता आहे. विशेष म्हणजे गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो. परंतु तो कायदा भारतीय राज्यघटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता. राष्ट्रीय स्तरावर ही भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केलं. त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना महिला व बालके वंचित घटक आदिवासी असंघटित कामगार शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री नामदार श देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व त्याचे काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये भूमिपुत्रांच्या सत्ता संघर्षात प्रशासकीय ‘वाघाची शिकार’? राहुल कलाटे यांना शह देत जितेंद्र वाघ यांची मुदतपूर्व बदली
हेही वाचा…निलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदे गटात केला पक्ष प्रवेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सहा आमदारांनी शरद पवारांना संपर्क साधला ? शरद पवार गटाचं संख्याबळ वाढलं
हेही वाचा…“अनेकवेळा मला उमेदवारीचा अर्ज भरायला लावला मात्र शेवटच्या क्षणी…,” पंकजा मुंडेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…“अजित पवारांना सत्तेत घेण्यासाठी शिंदेंशी चर्चा केली नाही,” शिवसेनेच्या बड्या आमदाराचा आरोप, शिंदे गटाचं भवितव्य काय ?