पुणे : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांचं आज वयाच्या ७६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर पेझारी येथे दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून राजकारणाचा वारसा लाभला होता. शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली होती. राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केले होते. वाचनाची प्रंचड आवड असल्याने त्यांचे वक्तव्य समृद्ध झाले होते. त्यांच्या निधाननंतर राष्ट्रवादीचे दोन्ही नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी दुख व्यक्त केले आहे.
माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या एक झुंजार नेत्या अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मला कोणाचाही पराभव करण्यासाठी लढायचं नाही”, सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मिनाक्षीताई पाटील यांचं संपूर्ण कुटुंबंच शेतकरी कामगार पक्षाशी जोडलं गेलं आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे संस्कार झाले. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन मोर्चे, आंदोलनं केली. त्यांचं जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होतं. अलिबाग विधानसभेचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. सन १९९९ साली तत्कालिन विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्या कार्यरत होत्या. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या मिनाक्षीताईंच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाटील कुटुंबियांच्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असे अजित पवार यांनी ट्विट केले आहे.
हेही वाचा…“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप
दरम्यान, अलिबाग मतदारसंघातून १९९५, १९९९, २००९ अशा तीन वेळा मिनाक्षी पाटील विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी बंदरे आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्रीपद काही काळ सांभाळले होते. आपली अभ्यासपुर्ण भाषणे, ओघवती वक्तव्य शैली यांमुळे त्या उत्तम वक्त्या म्हणून ओळखल्या जात. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ही पाटील यांची खासियत होती. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि माजी आमदार सुभाष पाटील यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.
माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या एक झुंजार नेत्या अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2024
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं… pic.twitter.com/Jd464bgozN
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 29, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर..,” शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा कडक इशारा
हेही वाचा…शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर ; 7 जणांना पुन्हा संधी, तर एका जागेवर कॉंग्रेसच्या नेत्याला लॉटरी
हेही वाचा…मावळात बारणे विरूद्ध वाघेरे यांच्यात लढत ; बारणे विजयाची हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…नवनीत राणा कमळावर निवडणूक लढवणार ; अडसूळ आणि बच्चु कडू महायुतीचा धर्म पाळणार का ?
हेही वाचा..अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार, म्हणाले…