पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना जवळपास निश्चित झाला आहे. सलग तीन निवडणुकांत शिवसेनेनं ताकद दाखवल्यानंतर दोन गटांत तुंबळ लढाई होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारांचाही विरोध जवळपास मावळला आहे. त्यामुळे आता श्रीरंग बारणे महायुतीचे अधिकृत उमेदवार झाले आहेत.
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का..! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द
महायुतीतील मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. भाजपने कमळावर उमेदवार असावा, अशी मागणी केली होती, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मावळावर दावा ठोकला होता. खासदार बारणे हे कमळावर निवडणूक लढवतील, अशी अनेक दिवस चर्चा होती, परंतु या चर्चेवर पडदा टाकत त्यांनी आपले नाव शिवसेनेच्या यादीत असेल असे स्पष्ट केले होते. अखेरीच शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यात बारणेंना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
हेही वाचा..भारती पवार यांना माहेरमधूनच प्रंचड विरोध ; विजयी होण्याचा मार्ग खडतर
दरम्यान, श्रीरंग बारणे यांनी मावळातून पहिल्यांदा २०१४ साली लोकसभेची निवडणुक लढवली होती. त्यात त्यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ साली देखील त्यांनी आपला मतदारसंघ आपल्याच ताब्यात राखला. तर २०२४ साली पुन्हा बारणे विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मावळ मतदारसंघ दोन जिल्ह्यांत विभागला असला तरी यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक आणि दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. बारणे हे थेरगावमधील तर वाघेरे पिंपरी गावातील रहिवासी आहेत. दोन्ही स्थानिक उमेदवार असल्याने गावकी-भावकीच्या मतांची विभागणी होणार आहे. याचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नवनीत राणा कमळावर निवडणूक लढवणार ; अडसूळ आणि बच्चु कडू महायुतीचा धर्म पाळणार का ?
हेही वाचा..अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार, म्हणाले…
हेही वाचा…“मला कोणाचाही पराभव करण्यासाठी लढायचं नाही”, सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…अभिनेता गोविंदा शिंदे गटात दाखल ; गोविंदाला अमोल किर्तीकरांचं आव्हान पेलणार का ?
हेही वाचा…“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप