मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाबाबत मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांचा संबंध हा दाऊदशी संबंध जोडला जात आहे. असं वक्तव्य केलं होतं. आता यावर भाजपनेते नितेश राणे यांनी यावरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री
नितेश राणे पुढे म्हणाले की, माननीय पवारसाहेब हे फार मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने त्यांच्याबद्दल बोलता पण कामा नये. परंतु मी जे काही बोलणार आहे, ते एक भाजपचा कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता नाही तर एक सामान्य नागरीक म्हणून बोलणार आहे. मला पवार साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. तो व्यक्ती दाऊदबरोबर उठणारा बसणारा आहे. जो की तुमच्या पक्षातील महत्वाचा मंत्री आहे. मग अनिल देशमुख यांचा तुम्ही राजीनामा घेतला. मग त्यांचा का घेतला नाही.
राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे खाल्ल्यामुळे ते सध्या तरुंगात आहेत. ते देशद्रोही किंवा देशाविरोधात कारवाई करताहेत म्हणून तुरूंगात नाही. तरी देखील त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला गेला. त्यांचा राजीनामा तुम्ही लगेच घेता तर नवाब मलिकांचा का घेत नाही ? मग आम्ही असं म्हणायचं का अनिल देशमुख एक हिंदू, मराठा असल्याने त्यांचा राजीनामा लगेच घेतला. मग तुम्हाला नवाब मलिक एक मुस्लिम कार्यकर्ता आहे म्हणून त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही, असं विचारलं तर चालेल का? असा सवाल ही नितेश राणेंनी केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांना चंद्रकांत दादा शिधा वाटप करणार
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यात जोर धरू लागली आहे. यासाठी उद्या मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काही काळात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडताना दिसण्याची शक्यता आहे.
Read also:
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”; संजय राऊतांचे पाटलांना चिमटे
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री