बीड : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांना दिलेली तारीख जवळ येत आहे. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. परंतु मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यातच आता बीडमध्ये जरांगे पाटलांची सभा होत आहे. त्याआधी पोलिसांकडून मराठा समाजातील लोकांना नोटीसा पाठविल्या जात आहेत.
हेही वाचा…“आदित्य राजाच्या कृपने वरूण राजानं अक्षर:श टेंडरचा पाऊस पाडला” ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. परंतु त्या सभेच्या आधी मराठा आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आली आहे. समन्यवयकांना नोटीशी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून कलम १४९ सीआरपीसीची नोटीस जारी करण्यात आली आहे. यानुसार जवळपास १२५ हून अधिक जणांना या नोटीशी बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवसानंतर राजकीय वातावरण चांगलचं तापणार आहे.
हेही वाचा…“मराठा आंदोलनादरम्यान शासनाने किती गुन्हे मागे घेतले?” फडणवीसांना सांगितला आकडा
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ तारीख जवळ येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार मनोज जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. आरक्षणावरची कार्यवाहीची माहिती जरांगे पाटलांना दिली जाऊ शकते. या शिष्ठमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भूमरे या नेत्यांचा समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात १७ पैकी १२ मंजूर विधेयके मंजूर ; मराठा आरक्षणावर तब्बल ३ दिवस चर्चा,” मुख्यमंत्र्यांची माहिती
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! शिंदे आणि अजित पवार कमळावर निवडणुका लढवणार; माजी मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा…सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रं देण्याचा वेग वाढवला, आतापर्यंत ‘इतके’ प्रमाणपत्राचं वाटप
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ युवा नेत्याने केली आत्महत्या ; आत्महत्या की घातपात संशय ? पुण्यात एकच खळबळ
हेही वाचा…“आम्ही अदाणीला घाबरत नाही, भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करू”, वर्षा गायकवाड कडाडल्या