मुुंबई : मोठ्या बंदोबस्तात आज एकनाथ शिंदे दहादिवसांनी मुंबईत दाखल झाले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजभवनात गेले. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा भाजप आजच दावा करणार असून त्यांचा शपथविधी सांयकाळी सात वाजता होण्याची शक्यता आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
..त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल; रोहित पवारांचं सुचकं वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, त्याचा आम्हाला आनंद नाही. जी परिस्थिती उद्धवली होती. त्यात सर्व 50 आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात काही प्रश्न, अडचणी होत्या. वाईट अनुभव येत होते. तेव्हा आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व 50 आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरे यांच्याबाबत आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही”; रूपाली चाकणकरांचं ट्विट व्हायरल
सरकार स्थापनेसंदर्भातील पुढील प्रक्रियेसाठी सर्व 50 आमदारांनी मला अधिकार दिले आहेत. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. मी परत गोव्याला येणार आहे. असंही ते म्हणाले. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
काय ती झाडी, काय तो डोंगार? एकदम ओके सरकार; अमोल मिटकरींचा खोचक टोला
दरम्यान, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस. असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते.
Read also
- मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी
- 15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;
- फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
- इडीचे अधिकारी आता कुलुप आणायला गेलेत; राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल
- २५ हजार कोटींची फाईल्स असेल तर मंजूर कशी करणार? अजित पवार कॅबिनेट मंत्र्यांवरच संतापले