मुंबई : माझी चार वर्षांची मेहनत व्यर्थ गेल्याची म्हणत ठाकरे गटाच्या पुर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या. प्रा.शिल्पा बोडखे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्याआधी शिल्पा बोडके यांनी ठाकरे गटातील विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांच्यावर गंभीर आरोप लावत त्या पक्षात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं ऐकत नसून स्वत:च मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही त्यांनी लावला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना ठाकरे गटावर आणखी काही आरोप लावले.
हेही वाचा…“उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांची मोठी घोषणा, फडणवीसांवर चढवला पुन्हा हल्ला,” म्हणाले…
बाळासाहेब सर्वसामान्य शिवसैनिकांशी सुद्धा बोलत होते. त्यांच्या भावना जाणून घेत होते आणि आम्हाला न्याय देत होते. पण आता तिथे तशी परिस्थिती राहिलेली नसल्याचे शिल्पा बोडखे यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रथमच भेटले. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून वाटलं की, ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत. महाराष्ट्रभर विकासकामं करत आहेत. म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मी खऱ्या शिवसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी म्हटले.
तसेच वर्षानुवर्षांपासून उबाठा भवनमध्ये काम भरण्याची परंपरा असून एकदा का पक्षप्रमुखांचे कान भरले की ते बोलवलतही नाही आणि भेटतही नाहीत. उबाठा गटामध्ये ही परंपरा आहे की, महिला नेतृत्व उभे राहत असेल तर त्यांच्यावर आरोप लावणे, त्यांचे खच्चीकरण करणे. हा त्रास अडीच महिन्यांपासून दिला जात होता. तसेच विदर्भामध्ये वसुली गॅंग बसली आहे. असेही म्हणत त्यांनी विशाखा राऊत आणि नेवाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच जी महिला त्यांना पैसे कमावून देते, तिला पत्रात उभं करायचं. जी प्रामाणिकपणे काम करते, तिला त्रास देण्यात आला. मला असाच त्रास देण्यात आला. पक्षप्रमुखांना मी सगळं सांगितलं पण त्यांनी मला न्याय दिला नसल्याचेही सांगितले.
हेही वाचा…दोन दिवसापुर्वी ठाकरे गटावर गंभीर आरोप, अन् आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ‘या’ महिला नेत्याची जोरदार चर्चा
बाळासाहेबांची शिवसेना उबाठा गटात राहिलेली नाही आहे. तिथे आमची कोणी दखल घ्यायला विचाराललाही तयार नव्हते. असे म्हणत त्यांनी याआधी ठाकरे गट सोडून गेलेल्यांच्या कित्ता गिरवला. त्यानंतर त्यांच्यावर गद्दार गद्दार अशी टिका करण्यात आली. त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. दुसऱ्यांना गद्दार म्हणत निष्ठा वगैरेच्या बाता करण्यापेक्षा उबाठा मधील ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काम करता. ते नेृत्व आपल्या पदाधिकाऱ्यांशी एकनिष्ठ आहे का ? असा सवाल त्यांनी थेट ठाकरेंना केला. तसेच आपल्या आई बहिणींचा अपमान होत असेल तर मृग गिळून गप्प बसत एकनिष्ठ एकनिष्ठ असल्याचे ढोंग करून काय उपयोग ? असा खोचक सवाल देखील शिल्पा बोडखे यांनी केला.
राजकारण असो वा कोणतेही सामाजिक क्षेत्र महिलेला आपला आत्मसन्मान व स्वाभिमान महत्वाचा असतो व तो आपण जपला पाहिजे ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करत असतो व तिथे जर वारंवार आपला अपमान केला जात असेल त्या बद्दल ज्यांच्यावर विश्वास ठेऊन आपण काम करतो ते नेतृत्व आपल्याला न्याय… pic.twitter.com/C0IvbvJ4kA
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 26, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणावर शरद पवार अन् उद्धव ठाकरे गप्प का ? भाजप नेत्याचा सवाल
हेही वाचा…“पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार”, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना डिवचलं
हेही वाचा“राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी फडणवीसांनी फुंकली,” राऊतांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करून फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“गोर गरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक ” गणपत गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाडांना रूग्णालयातून डिस्चार्ज
हेही वाचा…“बारामतीतून सुनेत्रा पवार दीड लाखांनी विजयी होतील,” भाजपच्या ‘या’ माजी खासदाराने वर्तवला अंदाज