मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोरदार भाषण करीत राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना सोडण्याचा प्रसंग देखील सांगितला. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देखील अप्रत्यक्ष टोला लगावला. केवळ राजकारण करून कामे केल्याचा अविर्भाव काही पक्षांकडून होत आहे. मनसेचे काम बोलते. आतापर्यंत अनेक आंदोलने केली आणि ते यशस्वीही करून दाखवली असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. त्याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं. लोकांनी मतदान कुणाला केलं होतं. दोन्हीकडच्या मतदारांना काय वाटलं असेल. तुम्ही त्यांच्यासोबत गेला. भाजप सेनेच्या मतदारांना वाटत असेल दोन्ही काॅंग्रेस नको म्हणून तुम्हाला मतदान केलं. ते नकोत म्हणून मतदान केलं. तुम्ही त्यांच्यासोबत जाता. ही हिंमत होते कशी. जेव्हा लोकं शासन करत नाही. शिक्षा करत नाही. तेव्हाच ही हिंमत होते. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही आमच्या मतांची किंमत केली नाही. तुम्ही प्रतारणा हे सांगत नाही. तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबी हेच राहणार आहे. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
शिवसेनेतून सत्तेसाठी बाहेर पडलो नव्हतो, बाहेर जाऊन वेगळा पक्ष काढला होता. हे सगळे बाळासाहेब ठाकरे यांना कल्पना देऊन केले होते. शिवसेनेतून बाहेर पडताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावून घेतले होते. त्यांच्यापाशी गेलो तेव्हा त्यांनी मला प्रेमाने आलिंगन दिले आणि नंतर आता जा, म्हणून म्हटलं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी भाष्य केलं.
“फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
शिवराय हे मराठा, बाबासाहेब हे दलित, लोकमान्य टिळक, ब्राम्हण, ज्योतिबा फुले हे माळी असे आपल्याकडे प्रत्येक महापुरूष जातीमध्ये वाटून घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्याचं काम करीत आहे. तसेच माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे नाव असलं काय नसलं काय. ? त्यांनी काही फरक पडत नसतो. माझ्याकडे सगळ्याच मौल्यावान विचार आहे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. महाराष्ट्रातील ज्या महापुरूषांनी जे विचार पेरले, ते ऐकणे, वाचणे घेेणे अत्यंत महत्वाचं आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; सभागृहात जोरदार खडाजंगी
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”