मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सुभाष भानुदास देशमुख वय 45 असणाऱ्या शेतकऱ्याने आज मंत्रालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. ही व्यक्ती सध्या गंभीररित्या भाजल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
सुभाष भानुदास देशमुख साताऱ्यातील कांदळगावचे रहिवासी आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती मोठ्या प्रमाणात भाजली आहे. भाजल्यामुळे अंगावरचे कातडी वेगळी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
“फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
दरम्यान, सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वप्रथम हा मुद्धा सभागृहात उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी संबंधित व्यक्ती साताऱ्यातील असल्याचं सांगितेले असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही व्यक्ती उस्मानाबादची असल्याचे म्हटले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू होता.
हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
अजित पवार याबाबत बोलत असताना अचानक देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या व्यक्तीने आत्मदहन केल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. गावातील शेतीसंदर्भात असलेल्या वादातून संबंधित व्यक्तीने हे कृत्य केले आहे. आम्ही लवकरच याबाबत सभागृहाला माहिती देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावरून अजित पवार यांना बोलू देत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार नाराज झाले. विधानसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केला.
Read also
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं