भंडारा: गोसीखुर्द प्रकल्पाच्या निमित्ताने राज्यात काही सत्ताधारी नेत्यांकडून सध्या केंद्राकडे बोट दाखविण्यात दाखवित राजकारण केले जात आहे. परंतु केंद्राने आतापर्यंत प्रकल्पासाठी ४०२९.३०७ कोटी रुपये दिल्याचे समजते. राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द राज्यस्तरीय प्रकल्प संबोधून अज्ञानाचे प्रगती प्रगटीकरण करणाऱ्या राजकीय नेत्यांनी आधी अभ्यास करून नंतर यावर बोलावे असे खासदार सुनील मेंढी म्हणाले.
हे पण वाचा: पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच
काही दिवसांपूर्वी एका सत्ताधारी आमदारांनी गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प राहिला नाही असे सांगून अज्ञानाची पावती दिली. सोबत केंद्राने गोसीखुर्द प्रकल्पाला मागील काही वर्षात एकही पैसा दिला नाही असे सांगून या महोदयांनी असे असल्यास राजकीय संन्यास घेईन असे सांगून टाकले.
गोसेखुर्द प्रकल्पला केंद्राची भरघोस मदत आहे..राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्थानिक पातळीवर आणुन "माननीयांनी" आपले अद्यान प्रकट करून आपल्या जनतेचे नुकसान करू नये….🙏@BhandaraBjp4 @BJP4Maharashtra @nitin_gadkari @Dev_Fadnavis @cbawankule @OfficeofUT @Jayant_R_Patil @NANA_PATOLE pic.twitter.com/VCWyuwcG8Q
— Sunil Mendhe (@mpsunilmendhe) July 23, 2021
हे पण वाचा: तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा
राज्य सरकारच्या या प्रकल्पासाठी निधी पुरवीत आहे, असे सांगणाऱ्या या लोकप्रतिनिधीला आघाडीचे सरकार एक वर्षापूर्वीच आले आहे आणि त्यापूर्वी पाच वर्ष भाजप आघाडीचे सरकार होते, याचा विसर पडला. भाजपच्या राज्य सरकारने गोसीखुर्द प्रकल्पाला ३८०४.०९५ रुपयाचा निधी दिला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पुढाकार घेत गोसीखुर्द प्रकल्पासाठी झुकते माप दिले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन गती देण्याचे प्रयत्न केला आहे.
ही वस्तुस्थिती असतानाही केवळ राजकारण करण्याऱ्या लोकप्रतिनिधींनी अभ्यास करूनच बोलावे असेही खासदार मेंढे म्हणाले. तयार असलेल्या गोष्टींचे लोकार्पण करणे यात धन्यता मानू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Read Also :
- पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच
- रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका