मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमनेसामने येतांना दिसत आहेत. यातच विरोधकांना सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप केला जात आहे. यातच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत विधीमंडळाच्या पायऱ्यांना नतमस्तक होत यावर पुढच्या काळात सभागृहात बसण्याची इच्छा नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, त्यासाठी मग अडाणी मेहुल चोक्सी, मोदी”, राऊतांची जहरी टिका
सभागृहातून बाहेर पडलो असून पुढील तीन दिवस सभागृह चालू राहणार आहे. उद्या गुढीपाडव्यानिमित्ताने आम्ही घरी चाललो आहे. त्यातील पुढची तीन दिवस मी सभागृहात येणार नाही. पुढच्या काळात सभागृहात येण्याची इच्छा राहिली नाही. मनात अत्यंत याबाबत वेदना आहेत. भास्कर जाधव सभागृहातील एकही दिवस चुकवत नाही. असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा अटकेत”, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,,
मला सभागृहात बोलू दिलं जात नाही. विषय मांडू दिले जात नाहीत. आताचं अधिवेशन, कामकाज नियमाने चालावं. कायद्याने चालावं. असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक चांगलचे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काही काळात राज्यात राजकीय परिस्थिती काय असणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा…“केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती”
- हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
- हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
- हेही वाचा…“मागण्या मान्य करा, अन्यथा..,” शेतकऱ्यांनी सरकारला दिला ४० दिवसांचा अल्टिमेटम, राजकारण तापणार
- हेही वाचा…तयारीला लागा…! लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभेच्याही निवडणुकांचा धुराळा उडणार ?