मुंबई : राज्यातील महामारीची दुसरी लाट, आता ओसरली आहे. मात्र, असे असले तरीही राज्यातील निर्बंध मात्र अजूनही कडक असून, त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठीच्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना वेळ मिळत आहे. बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट दिसून येत असून, ग्रामीण भागात देखील हे प्रमाण कमी झाले आहे.
भाजपचे आमदार सभागृहात धमकी देत आहेत; नाना पटोलेंचे गंभीर आरोप
दरम्यान, महामारीमुळे राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे वर्ग प्रत्यक्षात भरवणे अशक्य होते. मात्र, दूर दृश्य प्रणालीच्या व्यवस्थेमुळे ऑनलाईन वर्ग सुरु ठेवण्यात आले होते. यातच आता, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं, ग्रामीण भागांतील महामारीच्या परिस्थतीचा आढावा घेऊन आणि विद्यार्थ्यांचे हित पाहून, राज्यातील महामारीमुक्त ग्रामीण भागातील ८ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत मान्यता देऊन मोठा निर्णय घेतला आहे.
‘‘नितीन गडकरींचे कारखाने योग्य पद्धतीने चालू आहेत’’; चंद्रकांत पाटलांचे घुमजाव
ग्रामीण भागातील महामारीमुक्त गावातील ग्रामपंचायतींना, त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावाततल्या शाळेतील ८ वी – १२ वीचे वर्ग सुरु करण्याबद्दल पालकांशी चर्चा करुन ठराव संमत करावा आणि शाळा सुरु करतेवेळेस, मुलांना टप्प्याटप्प्यात बोलावण्यात यावं. याचाच अर्थ एकाड एक दिवस दिवशी, सकाळी आणि दुपारी महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत, शासनानं सांगितलेल्या कार्यपद्धतीचं पालन करण्यात यावं, अशी सूचना शालेय शिक्षण विभागानी दिली आहे.
भाजप आमदारांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या – तालिका अध्यक्षांचा खळबळजनक आरोप
तसेच, यावेळी महामारीसंबंधी सर्व ती आवश्यक खबरदारी घेण्यात यावी अशी सूचनाही शासनानं दिली असून, त्यासाठी कार्यपद्धती जारी केली आहे. त्याप्रमाणे, एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, त्यांची चाचणी करुन घेणे, या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं सांगितलं आहे.
इतर मार्गदर्शक सूचना…
शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था, त्याच गावात असावी.
शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे.
शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने घ्यावी.
शाळा क्वारंटाईन सेंटर असल्यास, स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी हलवावे.
संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वतःची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करणे बंधनकारक.
Read Also :
- “हे अधिवेशन राज्याचं नसून, केवळ तीन पक्षांचं अधिवेशन आहे”
- भाजपाच्या निलंबित आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, १२ चाच आकडा गाठण्यामागे नेमकं कारण काय?
- “हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा”, चित्रा वाघ यांचा इशारा
- “लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध”, “हिटलरशाही नही चलेगी”च्या नाऱ्यांनी दणाणला विधानसभेचा परिसर
- “आजची शिवीगाळ, धक्काबुक्की ही फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली झाली”- नवाब मलिक