मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा अतिरिक्त उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रूपाने विजय मिळवला. त्यानंतर आता 20 जुलै रोजी मतदान होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यावेळी भाजपने 5 उमेदवार मैदानात उभे केले आहेत. भाजपच्या पाठिंब्यांवर उभे असलेले अपक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदमधून माघार घेतली आहे.
राऊतांनी यापुढे जरी सांगितलं की तुम्ही मतदान आघाडीला देऊ नका तरी आम्ही..; देवेंद्र भुयार
विधान परिषदेसाठी उमेदवाराला विजयी होण्यासाठी एकुण 27 मताचा कोटा लागतो. भाजपकडे एकुण 113 संख्याबळ असून त्यात फक्त चार उमेदवार सहज निवडून येतात तर पाचवा उमेदवार विजयी होण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. तसेच सहाच्या सहा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपला 155 संख्याबळ नसल्याने सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचं बोलण्यात येत आहे.
“त्या गद्दारांच्या यादीत पहिलं नाव अब्दुल सत्तारांचं होतं”; सत्तरांना दानवेंचं जोरदार प्रत्युत्तर
सुरूवातीला भाजपकडून उमा खापरे या विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर सदाभाऊ खोतांना विजयी होण्यासाठी मार्ग मोकळा झाला असता. मात्र उमा खापरे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सदाभाऊ खोतांना आपला अर्ज मागे घेण्यास सांगितले. भाजपकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रा. राम शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच काॅंग्रेसकडून भाई जगताप, आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. जयंत पाटील यांनी देखील आज राष्ट्रवादी काॅंग्रेसकडील उमेदवारांची नावे घोषित केली आहे.
“राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार, हे माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय”; सुजय विखे पाटील
भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील पुन्हा देखील संधी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारी विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील असा विश्वास देखील जंयत पाटील व्यक्त केला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर २० जूनला विधान परिषदेच्या १० जागासांठी मतदान होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील एका गटाची मागणी विधान परिषद मिळावी अशी आहे.
Read also:
- “गांधी नावाच्या वादळाला आता हुकूमशहा घाबरु लागले, सत्य आमच्या सोबत”
- “सोनिया गांधी रूग्णालयात असून देखील त्यांना इडीची नोटीस, हे निगरगट्ट सरकार” प्रणिती शिंदे
- “मोहिते-पाटिल आणि शिंदे यांच्यात भांडण लावून अजित पवारांनी उजनी धरणावर दरोडा टाकला”
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”
- “शरद पवारांचं काम समुद्राएवढं विशाल, बच्चू कडूंनी त्यांचा अभ्यास करावा”