मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टिका टिप्पणी होत आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने यावरून शिंदे गटावर खालच्या पातळीवर जाऊन टिका करतांना दिसत आहे. यातच संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा…शिवसेनेच्या घटनेवरून निकाल देणार? शिवसेना कुणाची? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तसेच हे सरकार बेकायदेशीर असून प्रशासनानं त्यांचा आदेश पाळू नये. असं राऊतांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नाशिकमध्ये संजय राऊतांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राऊतांनी याबाबत जामीन अर्जासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल
दरम्यान, मागील काही दिवसांपासून संजय राऊत शिंदे सरकारवर सातत्याने टिका करतांना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी राऊतांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी शिरसाठ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्राद्वारे केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी राज्यात आघाडी निर्माण केल्याने राष्ट्रवादी पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर”, जयंत पाटील
हेही वाचा…“राणेंनी राज ठाकरेंची इज्जतच काढली…! १ आमदार असलेल्या पक्षांनी ३०२ खासदार असलेल्या पक्षांबद्दल बोलू नये”
हेही वाचा…सावनेर मतदार संघात काॅंग्रेसचे दोन नेते आमनेसामने, देशमुख केदारांच्या विरोधात दंड थोपडणार?
हेही वाचा…राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत भाजपचा विजय, ईश्वरी चिठ्ठीतून भाजपची बाजी
हेही वाचा…बुलढाणा बाजार समितीवर ठाकरे गटाचं गुलाल, आमदार संजय गायकवाडांना मोठा धक्का