मुंबई : शरद पवार यांनी महाविकास आघाडी राज्यात निर्माण केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच विरोधकांचे टार्गेट ठरला आहे. पण अधिक जोमाने काम करण्यासाठी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट दिशा देण्यासाठी, पक्षाच्या बैठकांचे पुढील काळात नियोजन केले जाईल असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. तसेच त्यांनी राज्यातील विविध मुद्यांवरही भाष्य केलं.
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल
समीर वानखेडे यांच्यावर होणाऱ्या कारवाईसंदर्भात ते म्हणाले की, माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्वच आरोप खरे ठरत आहेत. यातून मलिक यांनी मांडलेली माहिती खरी असल्याचे समजतेय. सध्या नवाब मलिक तुरुंगात जरी असले तरी ते बाहेर येतील तेव्हा योग्य ती माहिती याबाबत देतील, असे जयंतराव पाटील म्हणाले.
हेही वाचा…भाजप इलेक्शन मोडवर..! आगामी निवडणुकांबाबत पुण्यात भाजपची रणनीती ठरणार?
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने सूचित केले आहे. हा कालावधी पाच वर्षांची टर्म संपण्यापूर्वीचा असायला हवा. या कालावधीची व्याख्या विधानसभा अध्यक्ष लवकरच सांगतील अशी अपेक्षा असल्याचा टोला प्रदेशाध्यक्षांनी लगावला. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या वेळेत विधानसभा अध्यक्षांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब आहे. गृह विभागाने या घटनांच्या तपशीलात जाऊन ताबडतोब योग्य पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आज जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी राज्य सरकारने घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“राणेंनी राज ठाकरेंची इज्जतच काढली…! १ आमदार असलेल्या पक्षांनी ३०२ खासदार असलेल्या पक्षांबद्दल बोलू नये”
हेही वाचा…सावनेर मतदार संघात काॅंग्रेसचे दोन नेते आमनेसामने, देशमुख केदारांच्या विरोधात दंड थोपडणार?
हेही वाचा…राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत भाजपचा विजय, ईश्वरी चिठ्ठीतून भाजपची बाजी
हेही वाचा…बुलढाणा बाजार समितीवर ठाकरे गटाचं गुलाल, आमदार संजय गायकवाडांना मोठा धक्का
हेही वाचा…शिवसेनेच्या घटनेवरून निकाल देणार? शिवसेना कुणाची? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले