मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यातच आता या प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी मोठी माहिती दिली आहे.
हेही वाचा…कर्नाटकातला पराभव भाजपच्या जिव्हारी..! जे. पी. नड्डा पराभवाचा अहवाल मोदींना सादर करणार
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज विधीमंडळात या प्रकरणाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. निवडणुक आयोगाकडे पक्षाच्या जी संविधानाची प्रत आहे. ती मागवून घेऊ. त्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार निवडणुका झाल्या का? कामकाज केले गेले आहे का हे पाहिले जाईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. एकूण या गोष्टींचा विचार करता लवकरात लवकर निर्णय दिला जाईल. इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर अवलंबून आमचा निर्णय नसेल. तो स्वतंत्र असेल असंही राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…जामखेड बाजार समितीचा सभापती कुणाचा ? रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
पुढे बोलतांना ते म्हणाले की, माझ्याकडे ५४ आमदारांविरोधात ५ याचिका आल्या आहेत. लवकरच या याचिकांबाबत निर्णय घेईन. ठाकरे गटाचं कोणतंही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही. असं म्हणत घाई घाईत निर्णय घेतल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल. १६ आमदारांच्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल
हेही वाचा…भाजप इलेक्शन मोडवर..! आगामी निवडणुकांबाबत पुण्यात भाजपची रणनीती ठरणार?
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच एकच शहाणा माणूस, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी सगळेअतीशहाणे किंवा मूर्ख”
हेही वाचा…“आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली, जागावाटपासाठी समिती नेमणार” ?