मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सातत्याने सामनाच्या अग्रलेखामधून राज्य भाजप आणि केंद्र सरकावर टीका करत असतात. यावेळीही त्यांनी, राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन मोदी सरकारवर टीका केली असून, “राजकीय नेत्यांची सुरक्षाव्यवस्था, त्यांच्या सुरक्षेविषयी घेतली जाणारी काळजी आणि दिवसेंदिवस होत चाललेला अतिरेक, हे भीतीचेच लक्षण नाही का?, असा सवाल करत कलियुग म्हणतात ते हेच का?, अशी विचारणा केली होती.
पावसाळी अधिवेशन: ‘दलित, महिलांनी मंत्री झालेलं विरोधकांना बघवत नाही’
याला आता राज्य भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, “सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, आपल्या नेहमीच्या सकाळच्या सवयीनुसार पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनावश्यक आहे, असा जावईशोध लावला आहे, आपल्याला खरंच असे वाट असेल तर, सन्माननीय मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा, असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, या शब्दांत उपहासात्मक टीका केली आहे.
अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो
हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे संजयजी (२/२)— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 18, 2021
भाजप नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असा गनिमी कावा
तसेच, “गेली दीड वर्ष मुख्यमंत्री हे, बराच काळ एकतर त्यांच्या मातोश्री निवासस्थानी असतात किंवा ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर असतात. ते या दोन ठिकाणांव्यतिरिक्त कुठे फारसे फिरत नाहीत. त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही,” असा निशाणा मुख्यमंत्र्यांवर साधत, “आपले राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व जनतेपुढे आलेले आहे. राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत. आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. मुंबईच्या समस्या, आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश असून आधी सोडवाव्यात,”असा जोरादार हल्लाबोल त्यांनी ट्विट करत केला आहे.
अंतर्गत राजकारणामुळेच संजय धोत्रेंचा राजकीय बळी; राजकीय चर्चेला उधान
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत, काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितले होते, तर दुसरीकडे अमित शहांच्या गुजरातच्या दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना, घरांच्या दारे, खिडक्या बंद ठेवायचे आदेश दिले होते, यावरुन हे भीतीचेच लक्षण नाही का?, असं राऊतांनी अग्रलेखात म्हटलं होतं.
Read Also :
- मनसेचे मिशन २०२२: राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत जोर बैठका
- मुख्यमंत्री आज पंढरपूरकडे रवाना होणार, २० जुलै रोजी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार
- …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा; पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला
- मुंबईत पावसाने घेतलेल्या बळींना जबाबदार कोण? महापालिका की नागरिक?
- ‘अनिल बाबू आगे बढो हम तुम्हारे साथ है’; देशमुखांच्या समर्थकांकडून ईडी कारवाईचा निषेध