कोल्हापुर : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीकरीता येत्या 10 जून रोजी मतदान होत आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपला दोन तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवणे निश्चित झाले आहे. मात्र सहाव्या जागेसाठी कोल्हापुरात राजकीय पक्षांमध्ये रंगत वाढण्याची शक्यता आहे. कारण सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
राज्यसभेच्या सहाव्या जागेचं राजकारण हे कोल्हापुरात फिरताना दिसत आहे. कारण त्या जागेवर मागच्या वेळी भाजपकडून उमेदवारी दिलेल्या संभाजी राजे यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याची घोषणा केली होती. मात्र कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेतली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रंगत होणार आहे.
“बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. कोल्हापुरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कोल्हापुरात ताकद वाढवण्यासाठी भाजपने राजकीय खेळी करत धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.
“साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
दरम्यान, चंद्रकांत पाटलांना भाजपने पुण्यातून उमेदवारी दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला टक्कर देईल, असा उमेदवार भाजपला हवा होता. त्यामुळेच त्यांनी धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी उद्या दिनांक 31 मे ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असून 10 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सहावी जागा कुणाला मिळणार त्याकडे लक्ष आहे.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
- मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
- “मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?