चाळीसगाव : ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे हे सर्व जगजाहीर आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, मराठी माणसाचीच सत्ता येणार – संजय राऊत
चाळीसगावमधील नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ED, CBI या केंद्राच्या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची भूमिका हीच की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे. आमची बैठक झाली आहे. त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 12 सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत असं सर्वाना वाटतंय, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- “सेनेसोबत युतीचा विचारही नाही! पण भविष्यात काहीही होऊ शकते; पाटलांचे सूचक विधान
- मोठी बातमी! आमदार संग्राम जगतापांवर गंभीर आरोप, काँग्रेस नेत्यावरही विनयभंगाचा गुन्हा
- “प्रत्येक मंदिरात एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर…”; भाजपाचा सवाल
- महापालिका रणधुमाळी २०२२: राज्यातील सर्व महापालिका लढवणार, आम आदमी पार्टीची घोषणा