मुंबई : बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असं राऊत म्हणाले.
भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी
कर्नाटक सरकारचा कार्यकर्त्यांवर दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचं ठरवलं आहे. एकीकरणकरण समितीचे अध्यक्ष अॅड. दीपक दळवी असतील किंवा काही तरुण कार्यकर्ते असतील या सर्वजणांनी मेहनत घेतली आहे. या वेळेला बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षाने होत आहे. बहुमतामध्ये सत्ता असलेली महानगर पालिका द्वेषबुद्धीने बरखास्त करण्यात आली होती. भगवा झेंडा उतरवण्यात आला होता. अशी अनेक कृत्ये कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली होती, अशी टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
बेळगाव महापालिकेच्या एकूण 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 375 उमेदवार रिंगणात आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी बेळगावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेजारच्या बागलकोट जिल्ह्यातून अतरिक्त कुमक मागवण्यात आली होती. राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या, गृहरक्षक दलाचे 300 जवान आणि बागलकोट तालुक्यातील पोलीस जवान याठिकाणी तैनात आहेत. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांसह बहुतेक ठिकाणी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले होते.
Read Also :
- “नमस्कार ताई, तुम्हाला शब्द देतो…”, मुख्यमंत्र्यांनी दिले कल्पिता पिंपळेना आश्वासन
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, काय आहे प्रकरण?
- संभाजीराजेंसह शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट, नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर
- फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया