ठाणे : महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर, अनधिकृत फेरिवाल्याने कारवाई दरम्यान जीवघेणा हल्ला केला आणि यात त्यांच्या डाव्या हाताची बोटे कापली गेली. यांनतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी संबंधित हल्लेखोराला मोठय़ा शिताफीने पकडले आणि अखेर त्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनवरून पिंपळे यांच्याशी संवाद साधला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासनही दिले.
नियम पाळा, पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका – अजितदादांनी खडसावलं
ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी, आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावून त्यांचा आणि पिंपळेंचा संवाद घडवून आणला. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगत, “ताई, तुम्ही लवकर बऱ्या व्हा! आता आपण सोबत काम करायचं आहे. चिंता करू नका! मी तुम्हाला शब्द देतो , आरोपीला कडक शिक्षा होणार!,” असे आश्वासन दिले आहे.
भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी
दरम्यान, त्यांच्याशी साधलेल्या संवादांनंतर पिंपळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी फोन करून माझी विचारपूस केली. त्यांनी जो धीर दिला. त्यामुळे मोठे बळ आले आहे. आज बोटावर अजून एक शस्त्रक्रिया होणार आहे. हा माझा पर्सनल लॉस झालेला आहे. पण मी बरी होऊन कामावर येणार आहे. माझी महापालिका आणि सगळे कर्मचारी माझ्या पाठीशी आहेत. नक्कीच आरोपीला कडक शासन होईल. त्यासाठी आम्ही फास्ट ट्रॅकवर कारवाई करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
कासावडवली येथील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेच्या, माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या गेल्या असता, त्यांच्यावर एका फेरीवाल्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली असून, त्यांना वाचवयला पुढे आलेल्या अंगरक्षकाही त्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचे देखील एक बोट कापले गेले. कल्पिता पिंपळच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रीया झाली असून, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
Read Also :
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, काय आहे प्रकरण?
- संभाजीराजेंसह शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट, नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर
- फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
- “त्यावेळी कुठे गेला कायदा? नवाब मलिकजी…”, CBI च्या कारवाईवरून भाजप-राष्ट्रवादीत वाक्युद्ध