दिल्ली : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर, पुन्हा एकदा सत्तेतील भाजप आणि राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीच्यात यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनाक्रमांनंतर आता मराठा आरक्षणप्रश्नी भाजप खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
देशमुखांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
यांनतर, प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी चर्चेचा तपशील सांगितला. “१०५ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्याला त्यांचे अधिकार अबाधित आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं. त्यासाठी केंद्र सरकारचं कौतुक. मात्र, यावेळी लोकसभेत, राज्यसभेत आणि तेच राष्ट्रपतींना देखील आम्ही सांगितलं, की ५०% मर्यादेच्यावर जायचे असेल, तर तामिळनाडू, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांना जसे अधिकार दिले आहेत. तसे राज्याला द्यावे लागतील. कारण तुमची असामान्य परिस्थिती पाहिजे.”
महाराष्ट्रात पुन्हा Lockdown? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
“१९९२ च्या इंदिरा साहानींच्या केसमध्ये स्पष्ट सांगितलं आहे. असामान्य परिस्थिती म्हणजे, दूरवर व दुर्गम भाग असेल, तर ५० टक्क्यांवर आरक्षण मिळू शकते. मात्र, आत्ताच्या घटनादुरूस्तीने अधिकार दिले असले, तरी त्यात पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे, या व्याख्येत भौगोलिक परिस्थितीनुसार बदल करता आला किंवा संसदेला अथवा संबंधितांना सांगू शकलात, तर खऱ्या अर्थाने राज्याचे अधिकार हे अबाधित राहातील,” अशी विनंती केल्याचे ते म्हणाले.
“शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
तसेच, “या व्याख्येत बदल करता येत नसेल, तर ५० टक्क्यांचा कॅप वाढवून द्या. म्हणजे, ईडब्ल्यूएस ज्याप्रमाणे वाढवलेलं आहे? तसं ही केंद्राची जबाबदारी असेल,” असं सांगत, “राज्य सरकारने देखील सामाजिक मागास वर्ग आर्थिक, शैक्षणिकरित्या मागास सिद्ध करणं गरजेचं आहे. हे सिद्ध होत नाही, तोवर अधिकार अबाधित असले तरी, त्यात काही अर्थच राहणार नाही. या सगळ्या बाबी राष्ट्रपतींनी सविस्तरपणाने आणि शांतपणे ऐकून घेतल्या. ते म्हणाले, पुढची दिशा काय असेल? हे कळवतो.”
Read Also :
- फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी
- १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया
- विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – विनायक मेटे
- “त्यावेळी कुठे गेला कायदा? नवाब मलिकजी…”, CBI च्या कारवाईवरून भाजप-राष्ट्रवादीत वाक्युद्ध
- काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप, आता अजित पवारांनी केले राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य