मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपूरामधील घरावर आज सकाळपासून, सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले असून, यात घराची आणि नातेवाईकांची झाडाझडती घेतली आहे.
भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
तसेच, मुंबईमध्ये गेल्या ७ तासांपासून अनिल देशमुख यांची देखील चौकशी सुरू असून, देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांना ईडीने ताब्यात घेतले आहे, तर या सगळ्या चौकशी दरम्यान, डीसीपी राजीव भुजबळ आणि सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला असून, त्यात बार मालकांनी ३ महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली ईडीला दिली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
दरम्यान, यानंतर आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यात जोरादार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असलेल्या पाहायला मिळत असून, यात भाजप नेते नारायण राणे यांनीही, “ही कायदेशीर कारवाई आहे, राजकीय नाही. जसं मराठीत म्हण आहे, ‘करावे तसे भरावे’, आता भरण्याची वेळ आहे. जे केलं त्याची चौकशी सुरू आहे. यामुळे यात कुणी राजकारण करू नये, राष्ट्रवादी काँग्रेसने तर करूच नये, आता हे सिद्ध होऊ द्या बाहेर येऊ द्या, मग बघू काय आहे ते,” असा हल्लबोल राष्ट्रवादी आणि आघाडी सरकारवर केला आहे.
अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आज या विषयावर आपलं मत प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केलं. तसेच, “जे काही गुन्हे घडले आणि तपास यंत्रणांनी अटक केलेल्या लोकांनी जी काही माहिती दिली, त्या आधारावरच ही सगळी चौकशी आणि कारवाई सुरू आहे, हे आरोप आधी सिद्ध होऊ द्यात, मग बघूया,” असं आव्हान त्यांनी सरकारला केलं आहे.
Read Also :
- ठाकरे सरकरने राज्यात लागू केले पुन्हा निर्बंध; राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- राज्यातील शाळा-कॉलेज कधी उघडणार? गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!
- भाजपच्या बड्या माजी केंद्रीय मंत्र्याने साधले टायमिंग, केला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका १९ जुलै रोजीच होणार!
- आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी