भोपाळ : महात्मा गांधींच्या चुकीमुळेच 1947 ला देशाची फाळणी झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. रामेश्वर शर्मा हे मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आहेत.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या टीका करताना रामेश्वर शर्मा यांनी फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार धरले आहे. ते भोपाळमध्ये एका सभेत बोलत होते.
रामश्वेवर शर्मा म्हणाले की, दिग्विजय सिंह यांचे काम आणि व्यवहार जिनापेक्षा जास्त धोकादायक आहे. आधी जिनाने देशाचे विभाजन केले. 1947 मध्ये बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले. तसेच विभाजन दिग्विजय सिंह करत आहेत, असे शर्मा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रामेश्वर शर्मा याआधीही अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहेत.
Read Also :
- … अन् महिलेने भररस्त्यात राज्यमंत्री भरणे यांची कॉलर धरली
- नारायण राणेंना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच – राऊत
- मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, गिरीश महाजनांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- सर्वात प्रथम मोदी आणि उद्धव ठाकरेंनी लाईव्ह टिव्हीवर लस घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी
- ‘आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा सोडा’, खोत यांचा शेट्टींना टोला