मुंबई : मणिपुर दुर्घटनेचे पडसाद आता राज्यात देखील बघायला मिळत आहेत. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तर संसदेत देखील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे आमदार अतुल भातखळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या दिल्लीत दाखल, अमित शहांची भेट घेणार ?
मणिपुर घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारवर ताशोरे ओढले आहेत. आम्ही मणिपुर सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच कठोर पाऊले उचलू. महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. असं सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“दरडीचा अंदाज येत नसेल तर मग ते कसंल प्रशासन?” राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवर अतुल भातखळकर म्हणाले की, सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुकात आणि संसद ? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल असं भातखळकर यांनी म्हटले. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. त्यांचे आमदार सरन्यायाधीशांच्या कामावर ताशेरे ओढतायत, त्यांच्याविरोधात ट्वीट करत आहेत. संविधानिक व्यवस्थेत सुप्रीम कोर्टाला खूप महत्व आहे, हे माहिती असूनही हे लोक कोर्टावर ताशेरे ओढायची हिंमत करतात. कारण त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. असंही नाना पटोलेंनी म्हटलंय.
सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा…
कशाला हव्यात निवडणुका आणि संसद?
खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल. pic.twitter.com/HpE6lfqtMg— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ आहेतच’ अन् ते लवकरच मुख्यमंत्री होतील”
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची माळ ‘या’ तरूण काॅंग्रेसच्या आमदाराच्या गळ्यात, उद्या होणार घोषणा
हेही वाचा…शरद पवारांच्या निशाण्यावर आता प्रफुल्ल पटेल..! 28 जुलै ला राष्ट्रवादीचा मेळावा, कार्यकर्त्यांकडे लक्ष
हेही वाचा…“तुम्ही कोण, पात्रता काय, काय डोक्यावर पडल्यासारखे..”, अंबादास दानवेंनी भाजपच्या आमदाराची थेट इज्जतच काढली
हेही वाचा…ईडीकडून राऊतांच्या निकटवर्तींना पोलिस कोठडी..! सुजित पाटकर, सुरज चव्हाण नंतर नंबर कुणाचा ?