मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चार नेत्यांना स्थान मिळाले, मात्र चर्चेत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. यावरून मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, भाजपकडून मुंडे भगिनींना सातत्याने डावललं जात आहे, असा आरोप करत त्यांनी राजीनामाअस्त्र वापरले आहे. प्रीतम मुंडेंना न्याय मिळावा, या मागणीसाठी आत्तापर्यंत १०५ विविध स्तरावरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून, यामुळे भाजपत सध्या गोंधळ उडाला आहे.
नाशिकच्या हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा चोरीला
दरम्यान, या गोंधळावरून आपल्याच एका महाविकास आघाडी विरोधी वक्तव्याने गोत्यात आलेले काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून, “देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलणारे मुख्यमंत्री होते. भाजप बहुजन चेहऱ्यांचा वापर करून, त्यांना नंतर बाजूला करतो. भाजप हा बहुजन विरोधी आणि ओबीसी विरोधी पक्ष आहे. पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आलं आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.
गृहमंत्री अमित शहांचा दौरा: दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
तसेच, खडसेंना क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल, मंत्रालयातून गहाळ झाला असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावर बोलताना, “‘एकनाथ खडसे बहुजन समाजातील नेते आहेत. अश्या बहुजन नेत्यांचा चेहरा वापरायचा आणि नंतर फेकून द्यायचा, हे भाजपत सातत्याने घडत आलं आहे. ही झोटिंग समिती हा देखील एकनाथ खडसेंसारख्या माणसांना त्रास देण्यासाठी, त्यांना बदनाम करण्यासाठी बनवलेला एक फास होता का?, एक षडयंत्र होते का? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
“हो! पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय हे खरं आहे”
“खडसे आणि मुंडे या नेत्यांनी भाजपला वाढवलं. पण भाजपने दोघांवरही अन्याय केला, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. त्यांना अनेक वेळा डावलण्यात आलं, त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी देण्यात आली नाही आणि आता त्यांच्या मुलीवर भाजप अन्याय करत आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे’, असा घणाघात त्यांनी केला आहे.
Read Also :
- “मग ७ वर्षे या कुचकामी मंत्र्यांना त्यांच्या पदावर का ठेवलं?”
- महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ करण्यासाठी ठाकरे सरकार अवलंबणार ‘ओपनिंग अप’चा मंत्र
- एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
- सूत्र : वसुलीचे पैसे घेणारे ‘नंबर वन’ कोण? वाझेने जबाबात केला मोठा खुलासा- ईडी
- नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांचे सत्य बाहेर आलं पाहिजे, अन्यथा हा पोरखेळ बंद करा – मुनगंटीवार